विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न; ग्रामस्थांनी दोघांना बेदम चोपले



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील मौजे अजनुज (आनंदवाडी) येथील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 11 वर्षीय विद्यार्थ्यास स्विफ्ट डिझायर गाडीतूल पळवून नेण्याचा दोघांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत स्वताची सुटका करून घेतली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी गाडी पकडून दोघांना बेदम चोप दिल्याची घटना आज घडली.


नासिर गुलाब पठाण (28, रा. काष्टी.ता.श्रीगोंदा) व हरिभाऊ दत्तू वाळुंज (27, रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर समर्थ गणेश यादव (11, रा. आनंदवाडी, अजनुज ता. श्रीगोंदा) असे अपहरणाचा प्रयत्न झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ यादव हा विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे. आज बुधवारी सकाळी 9:30 वाजता शाळा सुटल्यानंतर त्याने काष्टी येथील यशोदा क्लास मध्ये 1 तास पूर्ण केला व घरी जाण्यासाठी अजनुज चौकात येऊन थांबला.


तेथे बिना नंबरची स्विफ्ट डिझायर गाडी येऊन थांबली गाडीतील एकाने आम्ही तुझ्या पप्पांचे आम्ही मित्र आहोत असे म्हणून गाडीत बसविले. तसेच इतर अनोळखी दोघांना गाडीत बसून त्यांना गणेशा व माळवाडी येथे सोडले व समर्थ यास पुढे घेऊन जात असताना खरातवाडी येथे संशयित वाळुंज याने त्याल्या चाकू दाखवून आरडा ओरडा केला तर चाकू पोटात खुपसील असा सज्जड दम दिला. दरम्यान पुढे मोठा खड्डा आल्याने गाडीचे स्पिड कमी झाल्याचे पाहताच तात्काळ समर्थ याने गाडीतून उडी टाकली व रस्त्या लगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी पळत गेला व त्यांना सर्व प्रकार सांगुन त्यांच्याकडून वडिलांना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.


गणेश यादव यांनी तात्काळ त्यांचे आनंदवाडी येथील मित्र महेंद्र गिरमकर यांना गाडी बाबत माहीती दिली. काष्टी सिद्धटेक रोडवरील आनंदवाडी फाटा येथे महेंद्र गिरमकर व त्यांच्या दहा ते पंधरा सहकार्यांनी गाडी अडवली व चौकशी केली असता सदर गाडीत मद्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्या दोघांना बेदम चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले. दरम्यान लहान मुले अपहरण करणारी टोळी पकडल्याची चर्चा श्रीगोंदा शहरासह तालुक्यात वार्यासारखी पसरली यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आरोपींना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान दोघा संशयितांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.

गणेश यादव यांनी तात्काळ त्यांचे आनंदवाडी येथील मित्र महेंद्र गिरमकर यांना गाडी बाबत माहीती दिली. काष्टी सिद्धटेक रोडवरील आनंदवाडी फाटा येथे महेंद्र गिरमकर व त्यांच्या दहा ते पंधरा सहकार्यांनी गाडी अडवली व चौकशी केली असता सदर गाडीत मद्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्या दोघांना बेदम चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले. दरम्यान लहान मुले अपहरण करणारी टोळी पकडल्याची चर्चा श्रीगोंदा शहरासह तालुक्यात वार्यासारखी पसरली यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आरोपींना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान दोघा संशयितांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post