शाळा सुरू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश



माय अहमदनगर वेब टिम

मुंबई-  जागतिक परिस्थिती बघता, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही . विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा, आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जागतिक परिस्थिती बघता, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारू शकत नाही. दिवाळीनंतर पुढचे काही दिवस आणखी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुलं आजारी आहे, किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post