शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधामुळे दिल्लीत मागील काही दिवसांपीसून सुरू असलेल्या हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज(रविवार) शरद पवार मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिराचा समारोप भाषणात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, "मागील काही दिवसांपासून दिल्ली पेटली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकता आल्या नाहीत म्हणून जातीवादाला चालना देऊन समाजाचे विभाजन त्यांनी केले. शाळांवर हल्ला झाला, शैक्षणिक संस्थांवर हल्ला झाला. हे सर्व लोक सत्तेत बसल्यामुळे घडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा दिल्लीला आले तेव्हा दिल्लीच्या एका भागात हिंसाचार झाला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत निर्णय घेणारे लोक आता पूर्णपणे विरोधात आहेत", असे म्हणन त्यांनी मोदींवर निशाना साधला.

पुढे पवार म्हणाले की, दिल्ली विधानसभा प्रचारामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांसह अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण होईल अशी विधाने केली. पण दिल्लीच्या जनतेने मात्र धार्मिक तेढ करणाऱ्यांना साथ दिली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत असताना एका विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे की काय? विशिष्ट धर्माच्या लोकांच्या शाळेत घुसून शालेय शिक्षण संस्थांचे नुकसान केले जात आहे,' अशीही टीका पवारांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post