कैलास गिरवले मृत्यू प्रकरणी एलसीबीच्या १६ कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्याचे कोर्टाचे आदेश


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-
 नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने एलसीबीच्या १६ जणांना हायकोर्टाने नोटिसा काढण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती ऍड नितीन गवारे यांनी दिली. या प्रकरनाची पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे.

दिवंगत माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल तपास व्हावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पिटीशन नं . ११९५ / २०१८ ची सुनावणी आज (दि . २०) रोजी दुपारी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवाळकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायालयाने संबंधित प्रकरणातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह १६ पोलिस कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटिसा जारी केल्या आहेत.


 तसेच संबंधित प्रकरणात राज्य गुन्हेअन्वेषण ( सीआयडी ) आजपर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी तारिख २७ मार्च २०२० नेमली आहे. पुढील सुनावणी तारखेपर्यंत सीआयडीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे. रिट पिटीशनर निर्मला गिरवले यांच्यातर्फे अॅड. नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडली. मनपाच्या केडगाव येथील प्रभागाच्या पोटनिवडणुकीत झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणानंतर सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी नेले होते.  दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यानंतर पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला अशा आशयाची तक्रार त्यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांनी आपल्या याचिकेत केलेली असून त्यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केलेली आहे. आज न्यायालयाने संबंधित प्रकरणात वरील आदेश केला असल्याची माहिती ऍड गवारे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post