माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अवतार मेहरबाबाच्या समाधीच्या ठिकाणी मौन पाळले तर मनाला शांती मिळते, त्यामुळे जगभरातून लोक येतात जगभरात शांतता नांदावी, माणूसपण जपलं जावं, म्हणून अवतार मेहेरबाबानी आयुष्यभर प्रयत्न केले. येथे असलेला सर्व धर्म समभाव,स्वच्छता काय असते हे आज प्रत्यक्ष पहिले असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईरालाने यांनी केले.
यावेळी त्यांनी समाधीचे दर्शन घेतले विश्वस्त रमेश जंगले यांनी त्यांचे स्वागत केले व सर्व माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी व मेहेरप्रेमी उपस्थित होते. सामान्य भाविकांप्रमाणे बराच वेळ त्यांनी येथे व्यतीत केला. मौन पाळले, प्रार्थना केली व मेहेरबाबा व समाधी याविषयी माहिती घेतली.
नगरपासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या अवतार मेहेरबाबांची समाधी असलेलं मेहेराबाद येथे स्वच्छता काय असते. आतंरराष्ट्रीय एकात्मता कशी असते याचे दर्शन घडत आहे मानवतेला जे अभिप्रेत होतं, त्या गोष्टी मेहेरबाबा कितीतरी आधीपासून इथं करत होते. दीन दलितांची सेवा,कुष्टरुग्णांना आधार, गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा अशी अनेक कामे मेहेर बाबांनी इथे सुरू केली. मेहेरबाबांनी त्यांच्या भौतिक अडचणी दूर करता करता आध्यात्मिक उन्नतीही केली.मेहेरबाबांचं हे काम अनेक देशात पोहोचलं.
राज्य शासन ज्या संत गाडगे बाबाच्या नावाने स्वच्छता अभियान राबविते त्यांनी या ठिकाणी येऊन बाबाचे कार्य पहिले.
नगर -दौंड रस्ताच्या उजव्या बाजूस टेकडीवरच्या समाधीकडे जाताना दोन्ही बाजूला असलेली वडाची झाडं आपलं स्वागत करतात. समाधी मंदिराशेजारी असलेल्या छोट्या पत्र्याच्या खोलीत मेहेरबाबा राहत होते. तीही खोली अजून जशीच्या तशी जतन करण्यात आली आहे.समाधी मंदिर असलेल्या टेकडीवर हजारो झाडं लावण्यात आली असून पाण्याची टंचाई असतानाही ती उत्तमरीत्या वाढवण्यात आली आहेत.
इतिहास कसा जपावा, हे इथं पाहायला मिळतं. देश-विदेशातील मेहेरप्रेमी इथं येतात, पण कुठे गोंगाट नाही की अस्वच्छता नाही. स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांचा ताफाही नाही."सेवेत प्रभुत्व' ही मेहेरबाबांची शिकवण अंमलात आणत प्रत्येक जण सेवाभाव जपत असतो.
Post a Comment