गिर्याराेहक अरुण सावंत यांचा हरिशचंद्र गडावर दुर्देवी मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : काेकण कडयावरुन बेपत्ता झालेले गिर्याराेहक अरुण सावंत यांचा आज (रविवारी) मृतदेह सापडला आहे. हरिशचंद्र गडावर रॅपलिंग करताना शऩिवारी (ता. 18) सावंत हे बेपत्ता झाले हाेते. स्थानिकांच्या मदतीने सावंत यांचा शाेध घेण्यात आला. कड्याच्या दरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान सावंत यांच्यासमवेत असलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आल आहे.
अरुण सावंत आणि अन्य गिर्याराेहकांची टीम असे एकूण 30 जण हरिश्चंद्र गडावर रॅपलींगसाठी आले हाेते. हरिश्चंद्र गडाचा काेकण कडा ते माकड नाळ या हरिशचंद्र गडावर गडाचाच एक भाग असलेल्या कड्यापर्यंत त्यांची टीम आधी वरुन खाली आणि त्यानंतर आडवं रॅपलींग करणार हाेते. रॅपलींगचा पहिला टप्पा जवळपास पुर्ण हाेत आला हाेता.
काेकण कड्यावरुन रॅपलींग करताना अरुण सावंत हे ग्रुप लीडर हाेते. त्यांच्यासमवेत 29 जण पहिला टप्पा उतरुन आले हाेते. सर्वांत शेवटी अरुण सावंत दाेरीचा सहाय्याने रॅपलींग करत असताना शनिवारी (ता.18) सायंकाळी पाच वाजता नाहीसे झाले. तेव्हापासून अरुण सावंत यांच्याशी काेणताही संपर्क झालेला नव्हता. स्थानिकांच्या मदतीने सावंत यांचा शाेध घेण्यात आला.
Post a Comment