अखंड हिंदुस्थान निर्माण होईल, पण लोकांच्या चुलीच विझल्या तर काय करायचे- शिवसेना



माय नगर वेब टीम
मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून जागा शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सुप्त तणाव निर्माण झाला आहे. जागावाटपावर एकमत न झाल्यास दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारीही सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पुन्हा एकदा भाजपविरोधी सूर आळवण्यात आला आहे.

देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवरून सरकारचे कान टोचले होते. मोदी सरकारने हेडलाईन मॅनेजमेंटमधून बाहेर पडून अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला होता. शिवसेनेने मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

वृत्तपत्रांना देशातील परिस्थितीचे गांभीर्य असले तरी सर्व लोक सत्य परखडपणे छापत नाहीत किंवा दाखवत नाहीत. सरकारच्या सोयीचे मथळे किंवा बातम्या देतात. मोदी-शहांचे सरकार उत्तम काम करत आहे. त्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवले. आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. आपले चांद्रयान-२ चंद्रावर जवळजवळ पोहोचलेच आहे. ते थोडेफार भरटकल्यानंतर पंतप्रधान मोदी इस्रोप्रमुख के.सिवन यांचे अश्रू पुसताना व धीर देतानाच्या हेडलाईन्स झाल्या. तरीही अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे 'सामना'त म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post