भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
लंडन-
वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला.
भारतीय संघाने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१६ धावांवर संपुष्टात आला. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ६९ धावा केल्या.


Post a Comment