निवडणुकीत गावची आगळी वेगळी परंपरा! ; ना मतदानाची सक्ती, ना पक्षाचा पोलिंग एजंट! L



लोकसभा निवडणूकीत हिवरेबाजार जपणार गावाची परंपरा

गुढीपाडवा निमित्ताने हिवरे बाजारच्या ग्रामस्थ सभेचा निर्णय 

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -  लोकसभा निवडणूकीची धामधूम सध्या सुरू असून पारनेर-नगर मतदारसंघातील हिवरेबाजार या निवडणूकीतही आपल्या गावाची परंपरा जपणार आहे. या गावात कोणालाही मतदानाची सक्ती केली जात नसून कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंट न देता गावकरीच उमेदवाराच्या सल्ल्याने पोलिंग एजंटची नियुक्ती करतात.

        हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने विविध राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले असून कोणत्याही मतदाराला मतदानाची सक्ती करण्यात येणार नसून परंपरेप्रमाणे मतदानाच्या वेळी गावकरीच पोलिंग एजंट देणार आहेत. मतदानासाठी मतदारांसाठी ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडवा निमित्ताने आयोजित ग्रामस्थ सभेत चर्चा झाली असून वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून आदर्श आचार संहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे.  

      हिवरे बाजारच्या ५००/१००० मतांचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास फारसा फरक पडत नाही. हिवरे बाजार ग्रामस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तसेच गावाला प्रामणिकपणे सहकार्य करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, प्रशासन पत्रकार यांच्यामुळे हिवरे बाजार पाहण्यासाठी दररोज राज्यातून, देशातून मोठया प्रमाणावर अभ्यास सहली येतात. त्यामुळे हिवरे बाजार हे ग्रामविकासाचे प्रेरणास्थान झाले आहे. 

          सन १९९० सालापासून प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकांना सर्व ग्रामस्थ एकत्र बसून कुठलीही सक्ती न करता कोणाच्याही अमिषाला बळी न पडता ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणत आहेत. पूर्वी सर्व मतदानाची एकत्रीत मोजणी होत होती, त्यामुळे कोणताही उमेदवार नाराज होत नव्हता. जेंव्हापासून बुथनिहाय मतदान मोजले जाऊ लागले तेंव्हापासून प्रत्येक उमेदवारास कोणत्या गावात किती मतदान झाले हे समजू लागले. तरीही कोणत्याही उमेदवाराने, लोकप्रतिनिधीनी यांनी नाराजी व्यक्त केली नाही. प्रत्यक्ष उमेदवार जर हिवरे बाजार भेटीला आले तर ग्रामस्थ त्यांना श्रीफळ देऊन स्वागत करतात.

पोपटराव पवारांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले घरातसुध्दा कोणाला मतदान करायचे हे सांगत नाही आणि गावात तर नाहीच उद्देश एकच उभे राहिलेले इतरांना प्रेरणा देणारे हिवरे बाजार गाव कायमस्वरूपी राहिले पाहिजे गेल्या ३५ वर्षानंतर प्रथमच झालेल्या सन २०२१ च्या हिवरे बाजार निवडणूकीतसुध्दा आदर्श आचारसंहितेनुसार याच पद्धतीने केली गेली. हिवरे बाजार स्वतसाठी नाही इतरांना विकासाचा  प्रेरणास्रोत बनले आहे. भारतीय लोकशाहीची ताकद म्हणजे निवडणूक प्रक्रिया असून लोकांच्या व गावाच्या समस्या सुटल्या पाहिजेत.निवडणुकीनंतर संपूर्ण गावांनी एकत्र येऊन गावात पद्मश्री सत्कार सोहळा साजरा केल्याचे उत्तम उदाहरण आहे.

          हिवरे बाजारच्या विकासात सर्वांनी सहकार्य केलेले आहे. यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या सर्व निवडणूकांमध्ये कधीही पोलिंग एजंट व बुथ यासारखा आग्रह कोणत्याही पक्षाने धरला नाही. यामुळेच हिवरे बाजारचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे.  देशातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मश्री सारखा सन्मान झाला त्यावेळीही विविध पक्षांच्या वतीने यथोचित सन्मान केला असल्याच्या भावना ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post