BREAKING : मुंबईतील स्फोटकांनी कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक


माय वेब टीम 

मुंबई - मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन जणांना अटक केली आहे. एका जणाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  NIA च्या पथकाने नव्याने दोन जणांना अटक केली आहे. संतोष आणि आनंद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे. यातील एका जणाला लातूरमधून अटक केले आहे. अटक करण्यात आल्यानंतर दोघांना NIA च्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता 21 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. या दोघांचा या प्रकरणामागे काय हात होता, याचा तपास एनआयए करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच  मनसुख हिरेन याच्या मृत्यूबद्दल अहवाल समोर आला आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही. यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.

याधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या टीमकडे आला होता. हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे. पण, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post