त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 46 टक्क्यांच्या पुढे



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात दररोज रुग्णांचा आकडा वाढत असताना कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांतही वाढ होत आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्क्यांवर पोहाेचला आहे. सोमवारी १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ वर गेली आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर १०९ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८८,५२८ वर गेली आहे. सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर ५ लाख ६४ हजार ३३१ संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८८,५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८%) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वाॅरंटाइन आहेत. सध्या २६,७६० लोक संस्थात्मक क्वाॅरंटाइन आहेत. तेथे एकूण ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post