म्हणून रणबीर-आलियावर रेल्वेने प्रवास करण्याची वेळ
माय नगर वेब टीम
मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघंही सध्या मब्रह्मास्त्रफ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. रणबीर आणि आलिया यांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट. या दोघांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधत आहे. रणबीर आणि आलियाच्या नात्याविषयी चर्चा होण्याचं कारण म्हणजे या दोघांमध्ये बहरणारं प्रेम. विविध कार्यक्रमांपासून थेट आफ्रिकेमध्ये जंगल सफारीसाठी जाणार्या रणबीर आणि आलियावर आता रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या या रेल्वे प्रवासाचा एक व्ह़िडिओही पोस्ट करण्यात आला आहे. जंगल सफारीहून परतलेल्या या सेलिब्रिटी जोडीला थेट रेल्वेने प्रवास करण्याची वेळ का बरं यावी? पडला ना तुम्हालाही हा प्रश्न? आता हे दोघं कोणत्या नव्या प्रवासाला वगैरे तर निघाले नाहीत ना…. हे असे तर्क लावूच नका. कारण, बी- टाऊनची ही जोडी रेल्वे प्रवास करत आहे ते म्हणजे एका जाहिरातीच्या निमित्ताने.
Post a Comment